Tuesday 22 September 2015

जाणुनिया न सत्य

जाणुनिया न सत्य,
सांगती ती असत्ये,
असत्यास ती मानती ती सत्य ,
घोळ हा सारा हा त्या सत्याचा ,
काळोखी सत्य समजे
प्रकाशितास असत्य समजे
किती दुर्भाव होई
मग सत्य हि पापण्या वरी
अन डोळ्या समोरील असत्य ते सत्य म्हणूनिया स्वीकारी
-राष्ट्रपाल काकडे

Tuesday 15 September 2015

कविता : गर्ज पण बरस

कविता : गर्ज पण बरस 

-राष्ट्रपाल काकडे (माझा दृष्टीकोन )

कविता : गर्ज पण बरस 


-राष्ट्रपाल काकडे
(माझा दृष्टीकोन )

Thursday 7 May 2015

बुद्ध म्हणजे काय ?


बुद्ध म्हणजे काय ? 





            बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे असा ; सम्यकसंबुद्ध , किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा तसेच त्यांस सर्वज्ञ किंवा अमर्याद ज्ञानी असे हि म्हणतात . बुद्ध हे व्यक्तीचे नाव नव्हे. ते मनाच्या स्थितीचे किंवा मनाच्या अवस्थेचे नाव आहे .मनाची अशी अवस्था कि , जी मानसिक विकासाच्या अति उच्च  शिखरावर पोहचलेली आहे.बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य ज्ञानप्राप्तीपुर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते .बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये क्रमाक्रमाने प्रगती करीत .दहा पारमितांचा परिपूर्ण अभ्यास करीत , त्यानंतर सम्यक संबुद्ध होत.




         पहिल्या अवस्थेत मुदिता (आनंद ) दुसरया अवस्थेत विमलता (शुद्धता) त्यानंतर प्रभाकारी (तेजस्विता) , अर्चिष्मती (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) , सुदूर्जया (जिंकण्यास कठीण) , अभिमुखी (पदार्थांची उत्क्रांती व तिच्या कारणांची बारा निदाने जाणणे), दुर जाणे , अचल (अढळ ) , साधुमती (धर्माच्या सर्व दिशा जाणणे ) आणि दहाव्या अवस्थेत धर्ममेध जाऊन त्यांस बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते .तेव्हा त्यांस बुद्ध म्हणतात